श्रीरामपूर-:सध्या तालुक्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू आहेत. या पंचानाम्यासोबतच सोयाबीनपिकावरील पिकावर 'यलो मोझ्याईक' (पिवळा व्हायरस) रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील करावेत, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पटारे यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्यातच तालुक्यातील कारेगाव सह अनेक गावांत सोयाबीन पिकावर 'यलो मोझ्याईक' (पिवळा व्हायरस) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या जुलै-ऑगष्ट महिन्यापासून या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
सोयाबीनवर अनेक फवारण्या करून रोग नियंत्रणात नाही आला ,आता त्या सोयाबीन पिकांना शेंगा पण खूप कमी प्रमाणावर आल्याआहेत त्यामुळे एकरी उत्पादनात 70 ते80 टक्के घट येणार आहे.
अतिवृष्टी चे पंचनामे चालू आहेत काही भागात पाऊस कमी आहे ,पण तिथे 'यलो मोझ्याईक' रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्या रोगग्रस्त सोयाबीन चे पण पंचनामे करावेत.
निवेदनावर शैलेश वाघ, जिल्हा वाहतूक आघाडी प्रमुख, लक्ष्मण कसबे, विद्यार्थी आघाडी प्रमुख, बाबा भांड, संतोष भागडे, डॉ रवी महाडिक, डॉ अरविंद बडाख, नितीन गवारे, ऋषिकेश मोरगे, विजय ढोकचौळे, मुकुंद लबडे, सचिन पवार, किरण गायधने, अरुण शिंदे, कैलास पवार, दादासाहेब झिंझ आदींची नावे आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment