एकलहरे प्रतिनिधी :- एकलहरे येथील नसीर नावाच्या ग्रामस्थाने तक्रार दखल केली की, दि. 15/02/2024 रोजी अर्जाचा संदर्भ घेत दिनांक 10/12/2024 रोजी मा. मुंबई उच्च न्यायालय यांचे खंडपीठ औरंगाबाद यांचे नावाने खोटी महिती दिली. माहितीची शहानिशा नसीर यांनी केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी खोटी माहिती दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असल्याने त्यांनी ग्रामसेवक व सरपंच विरुद्ध तक्रार दाखल केली.
आकृति बंधातील रिक्त पदासाठी कोणतीही प्रकरण न्यायप्रविष्ट नव्हते संबंधित अधिकाऱ्याने व पदाधिकार्यान स्वतः च्या मनमर्जिणे माहिती दिली असल्याचे सांगीतले.
मा. उच्च न्यायालयाचे WRIT Petition No. 10688 OF 2020 प्रमाणे सदर व्यक्तीने ग्रॅज्युटी मिळावी म्हणून प्रकरण दखल केले होते. सदर व्यक्ति हा मासिक वेतननुसार काम करत असल्याचे ऑर्डर मध्ये नमूद आहे. आकृतिबंधाचा त्यामध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सदर व्यक्तीचे आधार कार्ड पाहता 01/01/1945 जन्म तारीख असून आज रोजी त्याचे वय 81 वर्ष आहे व दि. 13/12/2024 रोजी या बाबत पंचायत समिति मा. गट विकास अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे लेखी पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांनी संबंधित प्रकरणावर मुख संमति दाखवली. असे केल्याने त्यांच्यावर दबाव असल्याचे जनतेतून बोलले जात आहे मात्र त्यांनी त्यावर कार्यवाही केल्याचा अहवाल देखील अद्याप दिलेले नाही.
या संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांचेवर BNS नुसार कलमे लाऊन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या तक्रारीवर चौकशी करुन आदेश व्हावा व उच्च न्यायालयाचे नाव घेत खोटी माहिती दिल्याबाबत दोषींवर BNS कलमा नुसार कार्यवाही व्हावी ही विनंती तक्रार अर्जात केलेली आहे..
No comments:
Post a Comment