श्रीरामपूर प्रतिनिधी : येथील ग्रामीण कवी आनंदा साळवे यांच्या मातोश्री कै. रखमाबाई नवशीराम साळवे (वय-८२) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या रखमाबाई यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रखमाबाई यांनी मोलमजुरी करून मुलांना मोठे केले. कवी आनंदा यांनी आईचे कष्ट लहानपणापासून पाहिले. आईच्या वेदना त्यांनी कवितेतून मांडल्या. माझी कविता आईविना पोरकी झाल्याचे कवी सांळवे म्हणाले
No comments:
Post a Comment