🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

अतिवृष्टी पंचनामे करून शेतकऱ्यांची वसुली थांबवापालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे छावाची मागणी



अहमदनगर - अतिवृष्टी चे पंचनाम्यासाठी अधिकारी येईपर्यत खळे झाले तरी पंचनामा करावा ,तसेच ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे आदेश देणे तसेच सर्व प्रकारच्या कर,कर्ज ,पाणीपट्टी ,ग्रामपंचयत थकबाकी वसुलीस स्थगिती मिळावी यासाठी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात(नगरपाथर्डीशेवगाव,तालुक्यातील )अतिवृष्टीढगफुटी सदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानी,पीक नुकसान भरपाई साठी पंचनामे सुरू आहेततलाठीग्रामसेवक,कृषिसहयक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचू पर्यत काही शेतकऱ्यांनी पाण्यातुन  सोयाबीन सोंगुण खळे केले कारण सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते म्हणून सोयाबीन,बाजरी,उडीत,मूग,भुईमूग,मका खळे झालेले पंचनामे व्हावेततसेच आकटोर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून आवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेतदि ०७/०९/२०२१ च्या पत्रा नुसार पाथर्डी,शेवगाव,नगर तालुक्यातील पशुधन हानी साठी जिल्हापरिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखल देऊन सादर योजनेत प्राधान्याने पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी तसे पत्र जिल्हापरिषदेच्या मुखकार्यकारीअधिकारी यांना द्यावेत. पंचनामे होऊन मदत मिळते किंवा नाही मिळत तोपर्यत सरकारी थकबाकी बैंक कर्ज वसुलीस,पाणीपट्टी,ग्रापंचयत थकबाकी,शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावीशासनाने एकरी५०हजार रुपये मदत घ्यावी.पीकविमा १००%मंजूर करावायासह इतर मागण्यांसाठीआपल्याकडे अखिलभारतीय छावा संघटनेच्या विनंती करण्यात येत आहे.

निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष)प्रवीण देवकर (जिल्हासारचिनीस)दत्ता वामन (जिल्हा सल्लागारदक्षिण)शैलेश धुमाळ(शहर संघटक) निवेदनाच्या प्रतीमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यपोलीस अधीक्षक आदींना पाठविल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Comments system