🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

दिवाळी एक जागतिक सण


दिवाळी एक जागतिक सण

 

 

                     ‘दिवाळी सण मोठा…. नाही आनंदाला तोटा….’  हिंदू धर्मात दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

 

दिवाळी आहे आपला

सर्वात मोठा सण

म्हणून धूमधडाक्यात

करतो साजरा प्रत्येकजण

 

 

                        हा सण संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो. हजारो वर्षापासून हा सण साजरा करण्याची पद्धत रूढ आहे. या सणानिमित्त संपूर्ण देशभर सार्वजनिक सुट्टी असते. पावसाळा नुकताच संपलेला असतो. खरीप हंगाम संपलेला असतो. नुकतेच पीक आलेले असते. शेतकऱ्याचे घर याच काळात धनधान्याने समृद्ध झालेले असते. तरीही अनेक नैसर्गिक व इतरही अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागतेच. त्यातल्या त्यात हा काळ शेतकऱ्याच्या भरभराटीचा काळ असतो. म्हणून कृषीउत्सव स्वरूपात हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. श्रावण महिन्यापासून सुरु झालेली सणांची मालिका दिवाळीला फार मोठ्या प्रमाणात बहरते. अश्विन वद्य द्वादशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीया पर्यंत हा दीपोत्सव सुरू राहतो. अशाप्रकारे साधारणत: सहा-सात दिवस हा सण अत्यंत आनंदातउत्साहात व जल्लोषात प्रत्येक घराघरातगावागावातशहराशहरात, राज्या-राज्यातसंपूर्ण देशात याच्याही पुढे जाऊन आज संपूर्ण जगात साजरा होत आहे. या दीपावली सणाची व्याप्ती बघून हा सण जागतिक सण झालेला आहे. या सणाच्या संदर्भात अनेक अध्यात्मिकपौराणिक कथा सांगितल्या जातात. फार मोठे महत्त्व या सणाचे आहे. दिवाळी हा खऱ्या अर्थाने कृषीउत्सव’ आहे.

 

 

                       दिवाळी या सणाची सुरुवात शेतकऱ्याला शेत पिकवण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या बैलाचे व त्याला जन्म देणाऱ्या गाईचे ऋण व्यक्त करण्याच्या दिवसापासून म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवसापासून होते. रमा एकादशी नंतर येणाऱ्या अश्विन वद्य द्वादशीला गोवत्स द्वादशीवसुबारस आणि गुरुद्वादशी असे म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानले आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असे समजल्या जाते. अशा पवित्र गोमातेची कृतज्ञ अंत:करणाने तिच्या वासरासहपासासह विधीवत पूजा करून तिला नैवेद्य दिला जातो. श्रद्धेने तिचे दर्शन घेतले जाते.

 

                   यानंतर आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. यालाच धनतेरस असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनधान्याचीधनसंपत्तीची पूजा केली जाते. सर्वत्र दिव्यांचा झगमगाट केला जातो. धनत्रयोदशी ची एक अध्यात्मिक कथा आहे या कथेनुसार या दिवशी अपमृत्युअकाली मृत्यू टाळण्यासाठी मृत्यू देवता यमाला दीपदान केले जाते. यमदीपदान करून प्रत्येकजण उदंड आयुष्याची प्रार्थना मृत्यू देवता यमाकडे करतात. याच दिवशी समुद्रमंथनातून आरोग्य देवता श्री धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रगटले होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंती सुद्धा साजरी केली जाते. यानिमित्ताने सर्व डॉक्टरवैद्यआरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी धन्वंतरी जयंती साजरी करतात. श्री धन्वंतरी देवतेची पूजा आराधना करतात. श्री धन्वंतरी जयंती औचित्य साधून संपूर्ण देशभरात डॉक्टरनर्सआरोग्य कर्मचारीसर्व प्रकारची औषधे यांचा आदर-सन्मान केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये श्री धन्वंतरी देवतेला प्रचंड महत्त्व आहे. दिवसेंदिवस आयुर्वेदाचे महत्त्व संपूर्ण जगाला ज्ञात होत आहे. म्हणूनच संपूर्ण जगात श्री धन्वंतरी जयंती  आयुर्वेद दिन धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा करण्यात येत आहे. अशाप्रकारे धनत्रयोदशी चे महत्व अनन्यसाधारण आहे.

 

                        यानंतर आश्विन वद्य चतुर्दशीला नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीचे पहिले पाणी साजरे केले जाते. या मुहूर्तावर अत्यंत अन्यायी असणाऱ्या नरकासुराचा वध भागवान श्रीकृष्णाने केला. व त्याच्या बंदिवासात असणाऱ्या सोळा सहस्त्र महिलांना मुक्त केले. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रभू श्रीकृष्णाने या सोळा सहस्त्र महिलांशी विवाह केला. अशी आख्यायिका सांगितल्या जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सुगंधी उटणे व तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते. दिवाळी सणात प्रभू श्रीकृष्णाच्या शौर्याचे प्रतिक म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

 

                 अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी स्थिर मुहूर्तावर श्री लक्ष्मी देवतेची पूजा आराधना केली जाते. घरामध्ये सुखशांतीसमृद्धी व आर्थिक भरभराट राहावी यासाठी श्री लक्ष्मी देवतेची उपासना केली जाते. श्रीसुक्ता चे पठण करण्यात येते. यथोचित व षोडशोपचार श्री लक्ष्मीदेवीची पूजाविधी घराघरात होतो. व्यापारी मंडळी यादिवशी आपल्या दुकानात विधिवत श्री लक्ष्मी देवीची पूजा उपासना करतात. वही पूजन केले जाते. याच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घराघरात लक्ष्मी रूपात वावरणाऱ्या लेकी-सुनामाता-भगिनीयांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातो. त्यांचा आदर सत्कार करण्यात येतो.

 

 

                  कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा यालाच दिवाळी पाडवा असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा हा मुहूर्त आहे. या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते. बळी हा शेतकऱ्यांचा राजा आहे. म्हणून आजचा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने बळीराजाचे प्रतिनिधित्व करतो. बळीराजा खूप दानशूर असतो. त्याच्याकडे आलेल्या कुणालाही दान देऊन तृप्त केल्याशिवाय तो परत पाठवत नाही. त्याचप्रमाणे आजचा शेतकरी सुद्धा संपूर्ण जगाला,  विश्वाला भरभरून देत आहे. शेतकरी हा संपूर्ण जगाचा,  विश्वाचा पोशिंदा आहे. तरीसुद्धा अनेक अस्मानी-सुलतानी संकटाला आजही शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. आजही शेतकऱ्यावर एकामागून एक अशी अनेक संकटे येत आहेत. हा आजचा बळीराजा संकटाशी सामना करता करता हतबल होत आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख नाहीसे व्हावे व त्याच्या जीवनातही सुखाचे दिवस यावेत यासाठीच बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा केला जातो. म्हणून या दिवशी म्हणतात..

 

इडा पिडा टळू दे

बळी राज्य येऊ दे...

माझ्या शेतकऱ्यावरची संकटे

देवा आता तरी संपू दे....

त्याच्याही जीवनात सुखाचे

चार दिवस येऊ दे

 

                    याच दिवशी संपूर्ण गोकुळ वासियांचे इंद्र प्रकोपाने होणाऱ्या अतिवृष्टी पासून संरक्षण करण्यासाठी भगवान जगद्गुरु श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलण्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे बलिप्रतिपदेच्या दिवशी भक्तीभावाने गोवर्धन पर्वत उचलून सर्वसामान्याचे रक्षण करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णांची पूजा केली जाते. व्यापारी मंडळी या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात झाली असे म्हणतात. पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीदाग-दागिनेवाहने, व नवनवीन मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक दुकानेअनेक कारखानेअनेक नवीन प्रकल्प सुरु होतात.अशाप्रकारे बलिप्रतिपदेला अत्यंत महत्त्व आहे.

 

                     कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी दिवाळी सणाचा शेवटचा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. यालाच यमद्वितीया असेसुद्धा म्हणतात. या बाबतही एक अख्यायिका सांगितली जाते. याच दिवशी म आपल्या बहिणीला म्हणजे यमुना अर्थात यमीला तिच्या आग्रहास्तव भेटायला जातो. यमुना यमाचे खूप आदरातिथ्य करते. त्याच्यासाठी घर सजवते. रांगोळ्या काढते. घरामध्ये दिव्यांची आरास करते. सगळीकडे झगमगाट करते. यमासाठी गोडाधोडाचे पंचपक्वान्न करते. या आदरातिथ्याने  यमुनेवर प्रसन्न होतो. तिला काय पाहिजे...?  ते मागायला सांगतो अर्थात वर देतो. त्यावेळी त्याची बहीण त्या मृत्यूदेव माकडे मागणी करते..... या दिवशी जी बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओवाळेल..... त्याचे औक्षण करेल.... त्याच्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करेल....  अशा प्रत्येक भावाला अपमृत्यू आणि अकाली मृत्यू येऊ देऊ नको....  त्याला दीर्घायुष्य मिळू दे....” हा वर मागते आणि म प्रसन्नतेने हे वरदान यमुनेला देतो तेव्हापासून कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया म्हणजे भाऊबीज साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचेमांगल्याचे आणि एकमेकांच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जात आहे.

 

                 अशाप्रकारे अश्विन वद्य द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशी पासून सुरु होणारा दिवाळी हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे यमद्वितीये’ पर्यंत चालतो. दिवाळी सणानिमित्त घरे सजवली जातात. घराची रंगरंगोटी सुशोभिकरण केले जाते. स्वच्छता साफसफाई केली जाते. घराला झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते. घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. वेगवेगळ्या पदार्थांचा फराळ केला जातो. घरावर आकाश कंदील लावला जातो. दीपावली सणांमध्ये दिव्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. या संपूर्ण सणात दिव्यांची आरास केली जाते. म्हणूनच खऱ्या अर्थाने दिवाळी हा दीपोत्सव आहे. प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार ज्ञानाच्या दिव्याने नष्ट व्हावा.... हीच प्रार्थना दिवाळीनिमित्त केली जाते. दिवा हे ज्ञानाचेप्रकाशाचेतेजाचेक्तीचेशक्तीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे.

 

                दिवाळी हा सण आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर दीपावली हा सण आज संपूर्ण जगामध्ये उत्साहातआनंदात आणि जल्लोषात साजरा होत आहे. दिवाळी या सणाला जागतिक स्वरूप येत आहे. जगभरातील भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथील न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरात ही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जातो. भारतगयानात्रिनदाटोबॅगोबीजिंगमलेशियाम्यानमारन्यूयार्कमॉरिशियससिंगापूरश्रीलंका या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. या सर्व देशात अत्यंत आनंदातउत्साहात आणि जल्लोषात दिवाळी सण साजरा केला जातो. अशा या जागतिक दीपोत्सवाच्या’ आपणा सर्वांना खूप खूप तेजोमय शुभेच्छा...

 

 

दीपावली.....

 

 

दिवाळी हाच आपला

आहे सण फार मोठा

गोवत्स द्वादशी साठी

स्वच्छ करू गाई गोठा

 

 

अश्विन-कार्तिक मासी

दिवाळी संधी काळाची

वसुबारसे पासून

सुरुवात या सणाची

 

 

सवत्स धेनु पुजावी

गोवत्स द्वादशी दिनी

आहे पवित्र गोमाता

हेच ठेवा तुम्ही ध्यानी

 

 

धनत्रयोदशी दीप

दान करा हो यमाला

अकाली मृत्यू टळेल

दीर्घायुष्य हो तुम्हाला

 

 

याच दिनी धन्वंतरी

प्रगटे समुद्रातून

जीवरक्षी डॉक्टरांचे

आभार हे मनातून

 

 

 

नरकासुराचा वध

नरकचतुर्दशीला

प्रभू श्रीकृष्ण आमचे

धाव घेती रक्षणाला

 

 

सर्व समस्या संपून

राज्य येऊ दे बळीचे

कृपा करी भगवंता

भाग्य उजळो शेतीचे

 

 

पाडवा आहे प्रतीक

बापलेकीच्या प्रेमाचे

रेशिमबंध गुंतले

पती-पत्नीच्या नात्याचे

 

 

बहिण-भाऊ आनंदे

भेटती भाऊबीजेला

करी औक्षन प्रेमाने

दीर्घायुष्य दे भावाला

 

 

सजले घर-अंगण

दीपावलीच्या सणाला

दिव्यांची आरास आहे

आकाश कंदील घराला

 

 

                                        लेखक / कवी

                              ©® मयूर मधुकरराव जोशी

             

No comments:

Post a Comment

Comments system